Uncategorized

पाऊस आणि चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात  7 जुन रोजी आलेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक गावातील काही घरांवर झाडे पडून तर काहिंच्या घराचे छत उडुन गेले जिवित हाणी नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन जनजिवन विस्कळीत झाले ,काही भागात वीज पुरवठा खंडित झाले.

या घटनेची माहिती मिळताच आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भ्रमनद्वानी द्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ त्या नुकसानग्रस्त भागातील जाऊन पाहणी करून आणि पंचनामे करून त्या त्या नुकसानग्रस्थ नागरिकांचा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना सूचना ‘जिल्ह्यातील या वर्षी पावसाळ्यात भर पाऊस पडण्याची शकत आहे.तसेच वीजपुरवठा कंडकटा होण्याची शकत आहे.सुरवातीलाच चामोर्शी तालुक्यात कुनघाडा आणि तळोधी मोकासा परिसरात काल विजांच्या कडकटासह थोडी गारपीटही झाली.यावेळी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.असून जिल्ह्यातील नागरिकांनी या पावसाडया सतर्क राहण्याची आव्हान माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सूचना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close