Uncategorized

त्या”नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन करू : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार

अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील आज सकाळच्या सुमारास नरभक्षी वाघाने महिलेला ठार केल्याची घटना घडली आहे.सदर घटना दुखत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर ठार झालेल्या महिलेचे नाव सुषमा देविदास मंडल असे आहे.सदर घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांना परिवारातील व्यक्तींना घटनेबाबत विचारणा केले.मृतक कुटुंबियांना वनविभागातर्फे आर्थिक मदत करावे अश्या सूचनाही दिल्या आहे.

मागील काही महिन्यांपासून गडचिरोल्ली जिल्ह्यांतील आरमोरी व गडचिरोल्ली तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सूरु आहे.या वाघांनी अनेकांचे बडी घेतलेले आहेत.अश्यातच अहेरी तालुक्यात”ही”घटना घडली.सद्यस्तिथीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आता सध्या कापूस काढणीचे काम परिसरात सुरू आहे.या घटनेमुळे सकाळी सुद्धा फिरणे अवघड झाले आहे.

त्या नरभक्षी वाघाला त्वरित जेरबंद करण्यात यावी.जर त्वरित या वाघाला जेरबंद न केल्यास नागरिकांना घेऊन वनविभाग कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close