Uncategorized

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात शालेय विद्यार्थ्यांना ने आन करण्यासाठी बसेस वेळेवर सोळण्यात यावी!!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे आगार प्रमुख घागरगुंडे,विभागीय नियंत्रक तसेच विभागीय वाहातूक अधिकारी यांचे सोबत चर्चा करून तोळगा काढण्यास सांगितले

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते आष्टी रस्त्यावर वसलेल्या खमनचेरू,बोरी,राजपुर,शिवनीपाठ,जामगाव,टिकेपली,धन्नूर,धमपूर,चौडमपली चंदनकेळी,आदि गावात बस सेवा वेळेवर मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना शाळेत पोहचण्यासाठी उशीर झाल्यास विध्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असे पालक वर्गाचें मनने आहे तर महामंडळ आगार प्रमुख यांचे म्हणने आहे की आम्ही बसेस वेळेवर सोळतो परंतु सुरजागडच्या जड़ वाहतुकीमुळे रस्त्यांवर गाड्या उभे राहतात त्यामुळे बसेस विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेवर पोहोचू शकत नाही.असे सांगितले त्यामुळे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व मा. जि. प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्वरीत तोडगा असे सूचना दिले.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,विनोद रामटेके,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधीकारी कार्यकर्ते तसेच आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close